तांबे प्रकरणावरून विजय वड्डेटीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर! - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'


तांबे प्रकरणावरून विजय वड्डेटीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर!

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

सत्यजीत तांबे प्रकरणावर राज्यात चर्चा सुरु आहे. मात्र, सत्यजीत तांबे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यात सत्यता आणि वस्तुस्थिती काय आहे, यावरून लोकांत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चूक झाली असेल तर कारवाई करावी. पण, विनाकारण, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असं मत माजी मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवर यांनी व्यक्त केलं.

विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना वड्डेटीवार म्हणाले, “थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब आहे. मात्र, राजीनामा मान्य करायचा की नाही, हा हायकमांडचा निर्णय आहे. याबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल.”

“काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपाच्या गडात आम्ही विजय मिळवला आहे.अमरावती विधानपरिषदेची जागा गृहित धरली नव्हती, तरी लोकांनी निवडून दिलं. विदर्भ हा भाजपाचा गड होता; पण लोकांनीच त्याला सुरुंग लावण्याचं काम केलं. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने आणि आपापसात ताळमेळ ठेऊन काम केलं पाहिजे,” असं विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं.

Pages