खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सावरगांव येथील ईश्वर कुंभारे या शेतकऱ्यास गौरखेडा - हेटी जंगल परीक्षेत्रात वाघाने हल्ला करून ठार केले .
सवीस्तर व्रूत्त असे आहे की , मौजा सावरगांव येथील शेतकरी ईश्वर कुंभारे वय - 45 हे आपल्या पत्नी सोबत शेतातील पऱ्ह्यातील पाणी काढण्यासाठी गेले होते .हे शेत बोडधा बीटातील वनक्षेत्रात जवळ लागुन आहे . काही अंतरावर त्यांची पत्नी कामासाठी गेली . पण दबा धरून बसलेल्या वाघाने ईश्वर कुंभारे यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले . पत्नीचे काम संपल्यावर ती पतीकडे आली तेव्हा 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली .#khabarkatta chandrapur
या घटनेची माहिती नेरीचे वनक्षेत्रसहाय्यक व्हि एन रासेकर यांना माहीत होताच तात्काळ घटनास्थळ गाठले व पुर्ण घटनेची माहिती घेतली व घटनेचा पंचनामा केला.#khabarkatta chandrapur

